गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

तरुणाईची मोड





आवाज..आवाज..आवाज  या आवाजाने साखर झोपेतून जाग आली बहुतेक ७ वाजलेले असावेत, हा आवाज कसला ??? हे बघण्याकरिता होस्टेलच्या खिडकीतून डोकावून बघितले..... तर दोन लोकांतील ( एक सुमारे ६०-६५ वर्षाचे  वृद्ध व २२-२३ वयोगटातील युवक)  संभाषण कानी पडले

वृद्ध : डाव्या बाजुनी overtake नसते करायचे!!

युवक : तु शिकवणार काय मला? (मोठ्या आवाजाने)

वृद्ध : मी सांगतोय तुला फक्त अथवा माझ्या अंगावरुन गेली असती car

युवक : मला सांगणारा तु कोण लागून गेलास (शिवीगाळ करत)

वृद्ध : इतका माज का??.......काय केलस अस आयुष्यात??

युवक : (शिवीगाळ करत ) Hotel management ची Degree आहे अशी तशी नाही नामांकित college ची आहे

हे सगळ दृश्य बघितल्यावर अस वाटतय कि विसरलोत काय आपण शाळेतील प्रतिज्ञा, विकास (नक्की कुणाचा ?) करण्यात इतके गुंतलोय का? कि नीतिशास्त्र, आई-वडिलांनी केलेले संस्कार , घडवलेले चारित्र्य हे विसरत जातोय ?

बनवू या न या अखंड देशाला महासत्ताक पण अश्या नापाक मनाने नको...........
 

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...